Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

महाराष्ट्र माज खपवून घेतं नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार...

महाराष्ट्र माज खपवून घेतं नाही शिंदे गटाचा धुआँ निघणार...

पुणे : शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुआँ निघणार आहे. महाराष्ट्र माज खपवून घेत नाही. सत्तेचा माज शिंदे गटाला आहे. त्यांचा धुवा उडणार आहे. सगळ्यांच पक्षाच धुसफूस आहे. एकमेकांच्या विरोधात लढले वरच्या नेत्यांनी युती केली.

जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत. एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, उदय सामंत नावेच मंत्री फक्त पैसे वाटायला होते. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही. नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

राज्याच्या राजकारणावर भाष्य

महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे. राज्याचा दौरा करणार आहे. गरीब, वंचित, तरुणांना राजकारणात आणणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले. मी अपक्ष होतो.कुठल्याही माणसाने ज्योतिष वर्तणं बरोबर नाही.सगळेच दावे करतात आम्ही येणार मी असे दावे करणार नाही. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल, असं रविकांत तुपकर म्हणाले.

जनता तुम्हाला जागा दाखवणार आहे. बुलढाण्याची फाईट टफ आहे. पण २५ वर्षे मी काम करतोय. त्यामुळे जनता संधी देईल. मी स्वतंत्र राहणार आहे. काही नेत्यांनी माझी अफवा उडवली. सामान्याचा मुलगा प्रस्थापीत मुलाने नेत्यांचा मेक-अप उतरवला. शेतकऱ्यांना माझ आव्हान आहे तुम्ही जागरुक व्हा… सरकार कोणतही असो शेतकरी विरोधात निर्णय घेतात, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.


Post a Comment

0 Comments