Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

दौंडमध्ये वारंवार वीज खंडित : नागरिक हैराण, व्यापारी पुण्याकडे स्थलांतर...


दौंडमध्ये वारंवार वीज खंडित : नागरिक हैराण, व्यापारी पुण्याकडे स्थलांतर...

दौंड (संघराज गायकवाड, मयुर साळवे):- दौंड शहर व तालुक्यासह गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अचानक वीज गायब होण्याने घरगुती वापर, उद्योग व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. तसेच अनेक व्यापारी दौंड सोडून पुणे किंवा बारामती कडे स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे.

दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रात्रीच्या वेळी देखील वीजपुरवठा खंडित होतो, ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीजखंडितीचे मुख्य कारण देखभाल आणि दुरुस्तीची कामे तसेच काही ठिकाणी तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी असा आरोप केला आहे की वेळोवेळी सूचना न देता वीज बंद केल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

यासंदर्भात प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून सातत्यपूर्ण वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी दौंडकर नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments