दौंड येथील संत तुकडोजी महाराज विद्यालय ते बालाजी नगर रस्ता खड्ड्यांनी भरलेला ; खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ; लिंगाळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
दौंड (मयुर साळवे, संघराज गायकवाड) :- दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या संत तुकडोजी महाराज विद्यालय ते बालाजी नगर दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे असून, वाहतूक करताना स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व दुचाकीस्वार यांना या रस्त्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून खड्डे अदृश्य होतात, त्यामुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात घडतात. अनेक वेळा स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments